आजचा कृषी सल्ला :
निंबोळी पेंडीचे फायदे:-
- शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे रानातील जमिनीतील वाळवी,हुमणी आणि ढेकूण या सारख्या किड्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होते.
- वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पासून पिकांचे संरक्षण होते. आणि पिके रोगराई ला बळी पडत नाहीत.
- शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे पिक वाढीस फायदा होतो त्याचबरोबर पिकाला अनेक वर्षे पर्यंत अन्नपुरवठा करत राहतात त्यामुळे इतर खतापेक्षा निंबोळी पेंड फायदेशीर ठरते.
- उपयुक्त असणाऱ्या जमिनीतील सूक्ष्म जिवाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे शेतात निंबोळी पेंड घालावी
- शेतात सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढण्यास मदत होते.
- शेतातील उत्पन्न वाढण्यास मदत होते. आणि शेतातील मातीची सुपीकता वाढते.
- निंबोळी खताच्या वापरामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते
टीप : कृपया निंबोळी पेंड वापरताना चांगल्या प्रतीची घ्यावी भेसळ युक्त वापरू नये.