अवकाळी पाऊस 

अवकाळी पावसामुळे बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

अवकाळी पावसामुळे बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. बीड जिल्ह्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही झाला.

बीडमध्ये तासभर पाऊस, वीज कोसळून गाय ठार

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. मात्र, दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पावसाला सुरवात झाली. जवळपास एक तास पाऊस सुरू होता. अंबाजोगाई, धारूर आणि परळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. काही भागात पावसामुळे दुपारच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे धारूर तालुक्यातील मोरफळा येथे एका गायीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस 

बीडप्रमाणेच नांदेड जिल्ह्यातही मंगळवारी अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर पोहचल्याने नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता. दुपारी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे लोक पूर्णपणे भिजून गेले. नांदेड शहरासह कंधार, लोहा, अर्धापूर यासह अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

हिंगोलीत शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान…

हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावाच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पहायला मिळत आहे. शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. गव्हाचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

मिरचीच्या पिकाचे नुकसान 

हिंगोली जिल्ह्यातील मसोद गावाच्या बाहेरील भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपिटीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशोक सातव या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर मिरचीला गारपिटीचा फटका बसला. सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गारांचा मार लागल्यामुळे झाडाला असलेल्या मिरच्या तुटून जमिनीवर पडल्या आहेत. त्यामुळे शेतामध्ये सगळीकडे मिरच्यांचा सडाच पाहायला मिळतोय. या गारपिटीमुळे शेतकरी अशोक सातव यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 

ॲग्रोक्रांती व्हाट्सअँप ग्रुप

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com