रब्बी कांदा उत्पादनाचे महत्व आणि बाजारभावावरील परिणाम

रब्बी कांदा उत्पादनाचे महत्व आणि बाजारभावावरील परिणाम

 

भारतातील शेती व्यवसायातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याचे उत्पादन रब्बी हंगामात अत्यंत महत्त्वाचे असते. देशातील एकूण कांदा उत्पादनाचा ५०-६०% वाटा याच हंगामातून येतो. एप्रिल ते जून या कालावधीत रब्बी कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होतो.

साठवण आणि विक्री:
शेतकरी काही प्रमाणात कांदा साठवून ठेवतात आणि डिसेंबरपर्यंत हळूहळू बाजारात विक्रीसाठी आणतात. यामुळे किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येतो.

उन्हाळ्यात (एप्रिल-जून) कांद्याच्या किंमती कमी होण्याची कारणे:-

मोठ्या प्रमाणात उत्पादन:
एप्रिल-जूनमध्ये रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते, ज्यामुळे पुरवठा प्रचंड वाढतो.

लहान शेतकऱ्यांवरील आर्थिक दबाव:
लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजांमुळे कांदा त्वरित विकावा लागतो.

साठवण सुविधांचा अभाव:
शेतकऱ्यांकडे साठवण चाळी उपलब्ध नसल्याने कांदा बाजारात विकला जातो. यामुळे अधिक पुरवठा होऊन किंमती कमी होतात.

ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान किंमतींचे चढ-उतार:-

इष्टतम साठवण:
रब्बी कांद्याची योग्य पद्धतीने साठवण आणि खरीप कांद्याचे सरासरी उत्पादन यामुळे मागणी व पुरवठ्याचा तोल साधला जातो.

  • परिणाम: किंमती तुलनेने स्थिर राहतात.

अधिक साठवण:
मोठ्या शेतकऱ्यांकडून अधिक प्रमाणात कांदा साठवला जातो. निर्यातीतील अडचणींमुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक होतो.

  • परिणाम: किंमती कमी होतात.

कमी साठवण:
प्रतिकूल हवामान, अपुऱ्या साठवण सुविधा, कमी उत्पादन किंवा अनुकूल निर्यात धोरणामुळे कांद्याचे कमी साठवण होते.

  • परिणाम: पुरवठा कमी असल्याने किंमती वाढतात.

किंमतींवरील परिणाम करणारे महत्त्वाचे घटक:-

हंगामी उत्पादनाचे स्वरूप:
कांद्याचे उत्पादन हंगामानुसार बाजारात वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध होते.

साठवण क्षमता:
मोठ्या शेतकऱ्यांकडे साठवण क्षमता असल्यामुळे किंमतींचे नियमन होऊ शकते.

निर्यातीचा प्रभाव:
अनुकूल निर्यात धोरण असल्यास किंमती वाढू शकतात, तर प्रतिकूल वातावरणात किंमती कमी होतात.

 

अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जोडले जा

https://chat.whatsapp.com/LicS8Fu6gePAvHjO3WeBo9

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com