सध्या तुरीला 11 हजारांवर बाजारभाव
तुरीच्या भावातील तेजी सध्या टिकून आहे. तुरीचा भाव देशातील बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी ११ हजारांच्या पुढे आहे. तर, जूनपर्यंत तूर बाजारात काही चढउतार होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
देशातील बहुतांश बाजारपेठांमध्ये तूरची किंमत 10 हजारांपेक्षा जास्त आहे. सध्या याची सरासरी किंमत 10,500 ते 11,500 रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल म्हणजेच जास्तीत जास्त भाव १२ हजारांच्या दरम्यान आहे. तर बाजारातील तुरीची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. कर्नाटकमधील तुरीची आवक खूपच कमी झाली. त्यामुळे डाळीच्या कारखान्यांना मालाचा तुटवडा जाणवत आहे. तर महाराष्ट्रातील आवकही कमी होत आहे.
देशातील बाजाराचा सध्याचा विचार केला तर तुरीचा कमी-अधिक प्रमाणात सरकारच्या नियमात राहून स्टॉक केला जात आहे. प्रक्रिया प्लांट्सचीही खरेदी गरजेप्रमाणे सुरू आहे. तर तुरीच्या डाळीलाही मागणी आहे. पण उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे. त्यामुळे तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे. पण पुढच्या दीड ते दोन महिन्यांत तुरीच्या भावातील सुधारणा मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.
कारण सध्या स्टॉक असलेल्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश जण तुरीची विक्री जूनमध्ये करू शकतात, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. तसेच आयातही सुरूच आहे. यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये दरातील वाढ मर्यादित राहू शकते. सध्याच्या भावात ५०० रुपयांपर्यंतचे चढ-उतार राहू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे जे शेतकरी या काळात तुरीची विक्री करण्याचे नियोजन करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान तूर विक्रीचा विचार करू शकतात, असेही अभ्यासकांनी सांगितले.
तसेच, यंदा पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे. तुरीची लागवड वाढेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला आणि लागवड खरेच वाढली तर याचाही काहीसा परिणाम बाजारावर दिसू शकतो. म्हणजेच तुरीच्या भावातील सुधारणा काही काळ थांबू शकते, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बहुतांश बाजारपेठांमध्ये तूरची किंमत 10 हजारांपेक्षा जास्त आहे. सध्या याची सरासरी किंमत 10,500 ते 11,500 रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल म्हणजेच जास्तीत जास्त भाव १२ हजारांच्या दरम्यान आहे. तर बाजारातील तुरीची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. कर्नाटकमधील तुरीची आवक खूपच कमी झाली. त्यामुळे डाळीच्या कारखान्यांना मालाचा तुटवडा जाणवत आहे. तर महाराष्ट्रातील आवकही कमी होत आहे.
देशातील बाजाराचा सध्याचा विचार केला तर तुरीचा कमी-अधिक प्रमाणात सरकारच्या नियमात राहून स्टॉक केला जात आहे. प्रक्रिया प्लांट्सचीही खरेदी गरजेप्रमाणे सुरू आहे. तर तुरीच्या डाळीलाही मागणी आहे. पण उत्पादन कमी असल्याने पुरवठा कमी आहे. त्यामुळे तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे. पण पुढच्या दीड ते दोन महिन्यांत तुरीच्या भावातील सुधारणा मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.
कारण सध्या स्टॉक असलेल्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश जण तुरीची विक्री जूनमध्ये करू शकतात, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. तसेच आयातही सुरूच आहे. यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये दरातील वाढ मर्यादित राहू शकते. सध्याच्या भावात ५०० रुपयांपर्यंतचे चढ-उतार राहू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे जे शेतकरी या काळात तुरीची विक्री करण्याचे नियोजन करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान तूर विक्रीचा विचार करू शकतात, असेही अभ्यासकांनी सांगितले.
तसेच, यंदा पाऊसमान चांगले राहण्याचा अंदाज आहे. तुरीची लागवड वाढेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला आणि लागवड खरेच वाढली तर याचाही काहीसा परिणाम बाजारावर दिसू शकतो. म्हणजेच तुरीच्या भावातील सुधारणा काही काळ थांबू शकते, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सणांला मागणी राहणार
एकदा तूर विक्रीचा हा टप्पा संपल्यानंतर किंमती पुन्हा सुधारण्याची अपेक्षा आहे, असे विश्लेषकांनी सांगितले. तूर आयात केली जात असली तरी देशात तुरीचा तुटवडा आहे. यावर्षी 30-32 दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित आहे. तर देशाला ४६ लाख टनांच्या दरम्यान तूर लागते.
त्यामुळे आयात वाढली तरी तुरीची टंचाई कायम राहील. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये 7 लाख 75 हजार टन आयात करण्यात आली. मागच्या हंगामात ८ लाख ९५ हजार टन आयात झाली होती. तर त्याधीच्या वर्षात ८ लाख ४० हजार टन तूर आयात झाली होती.
त्यामुळे आयात वाढली तरी तुरीची टंचाई कायम राहील. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये 7 लाख 75 हजार टन आयात करण्यात आली. मागच्या हंगामात ८ लाख ९५ हजार टन आयात झाली होती. तर त्याधीच्या वर्षात ८ लाख ४० हजार टन तूर आयात झाली होती.
आयातही महाग मिळत आहे
भारताला यंदा आयात तूरही महाग मिळत आहे. आयात केलेल्या तूर डाळींची सरासरी किंमत देखील 9 हजार ते 10 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे पुढील हंगामातील तूर येईपर्यंत तूर डाळींचे दर जास्त राहतील, असा अंदाज तूर बाजारातील विश्लेषकांनी वर्तवला आहे. सणासुदीच्या काळात तुरीच्या भावाला चांगलाच तडका मिळू शकतो. पण दरात काहीसे चढ- उतारही दिसतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.